मुंबई :- राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान; तर ३० मार्च २०२० रोजी मतमोजणी होणार आहे संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल २०२० ते जन २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १८ मार्च २०२० पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. : मतदान २९ मार्च २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी "" ५.३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होईल. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे - १३. रायगड - १, रत्नागिरी - ८, नाशिक - १०२. जळगाव - २.अहमनगर - २, नंदुरबार - ३८, पुणे - ६, सातारा - २, कोल्हापूर - ८. ४,औरंगाबाद - ७, नांदेड- १००, अमरावती - ५२६.अकोला - १. यवतमाळ- ४६१.बुलडाणा - १. नागपूर - १, वर्धा - ३ आणि गडचिरोली - २९६. एकूण - १५७०.
दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ । मार्चला मतदान; ३० मार्चला मतमोजणी