उल्हासनगर दि. १ प्रतिनिधी :-महापालिकांमधील कर्मचार्यांच्या हजेरी नोंदी करिता मनपाच्या प्रवेशद्वारावर बायोमेटिक मशीन बसवले आहेत. परंतु त्या गेल्या कित्येक महिन्यां पासून सदोष व नादुरुस्त आहेत. त्यातील या बिघाडा मुळे कर्मचाऱ्यांच्या हजेरी व्यवस्थित लागत नाहीत त्यातील वेळाडी सदोष असन अंगठ्यांचे ठसे स्पष्टपणे उमटत नाहीत. रामपाल टांक या सुर क्षकाने रात्री ११ वाजता ड्युटीवर रुजू झाल्यानंतर या मशिन वर अंगठा टेकवन हजेरी र लावली होती. मात्र त्या वेळेची नोंद झाली नाही. मात्र सकाळी जाण्याची वेळ मात्र आत येण्याची वेळ म्हणून सातची वेळ रेकॉर्ड झाली आहे तसेच, रामफल टांक हे सुरक्षा रक्षक ३१ जानेवारी २०२० रोजी सुट्टीवर असतानाही त्यांच्या येण्याची वेळ (०९:४६) आणि जाण्याची वेळ मात्र नोंद झालेली दाखवत होती. परंतु, नोंदवहीमध्ये त्यांच्या योग्य वेळा नोंद झाल्या आहेतया अशा बायोमेटिक मशीनच्या घोटाळ्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने त्वरित या मशीन दुरुस्ती कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मनपातील नादुरुस्त बायोमेट्रिक मशीनमुळे कर्मचारी हैराण